Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात ७२४० मेट्रिक टन अन्नधान्याचे लाभार्थ्यांना झाले वाटप ; जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे ;  शुक्रवार पासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध


सांगली जिल्ह्यात ७२४० मेट्रिक टन अन्नधान्याचे लाभार्थ्यांना झाले वाटप ; जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे ;  शुक्रवार पासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध
माणदेश एक्सप्रेस 
सांगली :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ६  एप्रिल २०२० या सहा दिवसात सांगली जिल्ह्यातील तीन लाख दोन हजार सातशे त्र्याण्णव (३,०२,७९३) शिधापत्रिका धारकांना तब्बल ७२४० मे. टन अन्नधान्याचे वाटप केल्‍याची  माहिती सांगली च्या जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे यांनी दिली आहे. दि. १ ते ६   एप्रिल २०२० या सहा दिवसात तब्बल ७७.२२% कार्डधारकांना अन्नधान्याचे वाटप झालेले असून सांगली जिल्हा धान्य वाटपामध्ये राज्यात अग्रेसर ठरलेला आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही शिधापत्रिकांमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे तीन लाख ब्याण्णव हजार (३,९२,०००) आहेत. या लाभार्थ्यांना १३५६ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यामध्ये २ रुपये किलो दराने प्रती कार्ड २३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड १२ किलो तांदूळ दिला जातो, त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो. सांगली जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजना या दोन योजनांमधून सुमारे ४३९३ मे.टन गहू, २८४७  मे. टन तांदूळ, तर २९२८ क्विंटल डाळींचे वाटप पॉस मशीनवरून करण्यात आले आहे. तसेच अंत्योदय अन्न योजना कार्ड धारकांना २१०.६२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेल्या सुमारे ३४९७ शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ दि १० एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता भारतीय खाद्य निगम कडून ९२०० मे. टन तांदळाचे नियतन प्राप्त करून घेतले आहे. दि १० एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक रेशन दुकानदार यांच्याकडील नियमित धान्याचे वाटप सर्व लाभार्थ्यांना पूर्ण झाल्यानंतर मोफत तांदळाचे वाटप करण्यात येईल. हे मोफत धान्य एप्रिल प्रमाणेच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, श्रीमती वसुंधरा बारवे यांनी दिली आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies