माणदेश एक्सप्रेस च्या बातमीने अखेर बेघर वसाहतीमधील गटारीच्या कामाला सुरुवात ; झोपलेल्या प्रशासनाला अखेर आली जाग
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे :अजनाळे, ता. सांगोला येथील ग्रामपंचायतीकडे गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी बेघर वसाहतीमधील नागरिकांनी लेखी व तोंडी तक्रार देऊन गटारी मध्ये पाणी साठवून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असे निदर्शनास आणून दिले होते. मात्र प्रशासन या मागणीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांमधून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. दोन दिवसापूर्वी माणदेश एक्सप्रेस ने यावर आवाज उठवल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, कर्मचारी, खडबडून जागे झाले व बेघर वसाहतीमधील प्रत्यक्ष गटारीच्या कामाला सुरुवात केल्यामुळे नागरिकांमधून माणदेश एक्सप्रेस चे कौतुक केले जात आहे.
दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा