महिलांचे ‘डिजिटल सक्षमीकरण’ ही काळाची गरज
विभागनिहाय महिला आयोगाचे कार्यालय लवकरच : महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
मुंबई : स्मार्टफोन, इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले असून त्याचा वापर वाढत असताना काही विकृती त्याचा गैरवापरही करत आहेत. बऱ्याचदा महिला या त्यांचे सोपे लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट) असते. यामुळे सर्वांनाच विशेषतः युवती, महिलांना ‘डिजिटली सक्षम’ करणे काळाची गरज झाली आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. तसेच संकटग्रस्त महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागस्तरावर लवकरच कार्यान्वित होईल, असेही त्या म्हणाल्या.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस