“अंगाशी आलं की बोंबलायंच हा शिवसेनेचा धंदा” : गोपीचंद पडळकर
औरंगाबाद : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील घर आणि कार्यालासह दहा ठिकाणी ईडीने आज सकाळी धाडी टाकत कारवाई केली. विशेष म्हणजे सरनाईक घरी नसतांना ही कारवाई झाल्याने शिवसेना चांगली आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे सांगत या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया दिली. यावर आता भाजपकडून देखील प्रत्युत्तर येऊ लागले आहे.
अंगावर आलं की बोंबलायचं ही शिवसेनेच्या नेत्यांची सवयंच आहे. रोज काही तरी आरोप करायचे, काम कमी आणि आरोप जास्त हेच त्यांचे उद्योग झाले आहे. त्यामुळे त्यांची टिका, आरोप फार मनावर घ्यायची गरज नाही, अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसनेनेवर हल्लाबोल केला. दिवाळीत बोंबलायची शिवसेनेला सवयच असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
पण अंगाशी आलं की बोंबलायंच हा शिवसेनेचा धंदा झाला आहे. दिवाळीत तर यांचे नेते अधिकच बोंबलतात. संजय राऊत यांनी शंभर जणांची यादी देतो असे आव्हान दिले आहे, त्यांनी ती यादी द्यावी, ईडी त्याचीही तथ्य असेल तर चौकशी आणि कारवाई करतील, असेही पडळकर यांनी सांगितले.