“त्यांना धर्मावर आधारित असलेली हुकुमशाही देशात आणायची आहे” : माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
फलटण : देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व काँग्रेसने दिलेली घटना यांना मान्य नाही. ही घटना निष्प्रभ करुन ते घटना व लोकशाही संपवायला लागले आहेत. त्यांना धर्मावर अधारित असलेली हुकुमशाही देशात आणायची आहे, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत काँग्रेस पुरस्कृत शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व राष्ट्रवादी पुरस्कृत पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये आयोजित मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
त्यामुळे भविष्यात येऊ घातलेला धोका वेळीच ओळखून या निवडणूकीसाठी मतदान करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करुन चव्हाण म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोसळायला लागली आहे. देशाची अर्थव्यवस्था कोव्हिड पुर्वीच कोसळली आहे. मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटीसारखे हल्ले केल्याने कोव्हिड पुर्वीच अर्थव्यवस्था 3.1 टक्क्यापर्यंत खाली आली. युपीए सरकारच्या काळात विकास दर साडे नऊ टक्के होता. ही निवडणुक भाजपाला रोखायची निवडणूक आहे. जिथे भाजपाच्या विचारांना आजवर यश आलं तिथे आपण त्यांना रोखलं तर ज्या कारणाने महाआघाडी सरकार अस्तित्वात आली. ते कारण सफल झाले, असे आपणास म्हणता येईल.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज