मुंबई : आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कोणाला त्रास का व्हावा? असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. राष्ट्रवादी अन् सेनेने युती करून जाहीर करावे. त्यांना युतीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी लवकर युती जाहीर करावी, असेही ते म्हणाले.
प्रताप सरनाईकांना लेटर बॉम्ब फोडला आहे. ते दोन पक्षाचे प्रकरण आहे. पत्रामध्ये सरनाईकांनी सांगितले, की केंद्रीय तपास यंत्रणेच्या त्रासामुळे ते सर्व करत आहे. आमची भूमिका भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सेनेला राष्ट्रवादीला त्रास देत आहे. त्याचा गैरवापर करत आहे, असे त्यांनी लिहिले आहे.
बाळासाहेबांनी भाजपला बोट धरून महाराष्ट्रात मोठे केले आहे. त्यांचाच मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री असताना त्यांची खुर्ची काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे निषेधार्त आहे. भाजपच्या नेत्यांनाही केंद्रामधून त्रास होत आहे. त्यांना केंद्रामधून जे सांगितले जाते तेच ते बोलतात. अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना त्रास आहे. अनेक खासदारांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे, असेही गंभीर विधान नाना पटोले यांनी केले आहे.