मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. यावर आता विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील महाविकासआघाडी सरकारला टोला लगावत ते म्हणाले, की हे महाविकासआघाडीला ठरवायचं आहे, की ते कोणासोबत युती करतील? एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.