माणदेश एक्सप्रेस न्युज I आटपाडी : आटपाडी शहरामध्ये रस्त्याची कामे करणाऱ्या राजपथ कंपनीच्या वाहणावर आबानगर चौक या ठिकाणी दगडफेक करण्यात आली असून जो पर्यंत सिमेंट रस्ता करीत नाहीत तो पर्यंत कामबंदच राहणार असल्याचा इशारा युवा नेते अनिल पाटील पाटील यांनी प्रशासनाला दिला.
यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले, आटपाडी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या सिमेंट रस्त्यांच्या कामसंबंधी वेळोवेळी चौकशी आणि निवेदन देऊनही संबंधित विभाग काहीही सकारात्मक पावले उचलताना दिसले नाहीत उलट आज त्यांनी काम सुरू केले.
सिमेंट रस्ता करा अशी मागणी असताना देखील राजपथ कंपनी आणि संबंधित बांधकाम विभागाने आमच्या मागणीकडे अक्षम दुर्लक्ष करीत आज काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि तो आम्ही हाणून पाडला. राजपथ कंपनीच्या वाहनांच्या काचा फोडून आम्ही आमचा विरोध दर्शविला आहे. तरीही प्रशासन आणि कंपनी याबाबाबत सकारात्मक आणि योग्य भूमिका घेत नसतील तर पुढे अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याला सर्वंस्वी तुम्ही जबाबदार असाल असा इशारा दिला आहे.
राजपथ कंपनीने आटपाडी शहरातील आमच्या हक्काचा रस्ता पूर्ण करावा ही आमची मागणी आहे आणि शेवटपर्यंत हीच मागणी कायम राहील.
अनिल पाटील