Type Here to Get Search Results !

देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ; शेतकऱ्यांचे उत्पन्न हि वाढणार


मुंबईः भारतात अन्नधान्य आणि शेती उत्पादनात आता नवा विक्रम करताना दिसत आहे. भारतातील शेती उत्पादने आणि अन्नधान्यामुळे जगाची भूक भागवली जात आहे. शेतकऱ्यांची ही मेहनत भारतील अर्थव्यवस्थेला मजबूत बनवत असल्याची माहिती, केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आधीच म्हणजेच दहा महिन्यांमध्ये भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


2021-22 या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यातच कृषी उत्पादनांच्या निर्यात ही 40.87 अरब डॉलर एवढी पोहचली आहे. आणि ही आकडेवारी एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यातीलच आहे. तसेच  मागील वर्षी या काळात भारताच्या कृषी उत्पादनांची निर्यातमध्ये 32.66 बिलियन अमेरिका डॉलर पर्यंत झाली होती.


राज्यमंत्री असलेल्या अनुप्रिया सिंह पटेल यांनी लोकसभेत सांगितले की, चालू आर्थिक वर्षात मुख्य शेती उत्पादने म्हणजेच गहू, साखर आणि कापूस या उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. 


भारतातून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनांची निर्यात वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, त्यामुळे त्यांच्या शेतीवर त्याचा सकारात्मक प्रभावही पडणार आहे. त्यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, निर्यातीमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो हे निश्चित करण्यासाठी उत्पादन संघटना आणि सहकार तत्वार काम करणाऱ्या समित्या आहेत, त्यांनी निर्यातीबाबत चर्चा करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी किसान कनेक्ट पोर्टल लाँच केले जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies