मुंबई: नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने मागील महविकास आघाडी सरकारमधील कामांवर 'डिपीडीसी'च्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयावर "स्थगिती" आणली आहे. दरम्यान हे सरकार येताच राज्यशासनात जे निर्णय घेतले जात आहेत, त्यात राज्यातील विकासात्मक कामांना स्थगिती देण्याचा आरंभ झाला आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे "स्थगिती देणारे सरकार अशी त्यांची प्रतिमा होऊ नये" असे माजी मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
तसेच , मुख्यमंत्री असताना जेवढी कामे कदाचित झाली नसतील, तेवढी कामे अथवा त्याच्या पेक्षाही जास्त कामे, या माझ्या या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात करता आली. त्यामुळे मी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानतो असे ते म्हणाले, असेही माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, विधान परिषद निवडणूक प्रसंगी ज्या काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केले त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, तर चंद्रकांत हंडोरे यांची सात मते फुटली हे जाणून बुजून झाले की कसे हे माहीत नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही चव्हाणांनी यावेळी केली आहे.