मुंबई : राज्यात शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यामुळे बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे. नव्या सरकारमुळे महाविकास आघाडी सरकारमुळे रखडलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्पाला गती मिळणार, अशी माहिती समोर येत आहे.
राज्यात आता भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनमधील खर्चाचा राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही शिंदे सरकार करणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेनला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने बुलेट ट्रेनचे काम मंदावले होते. परंतु, आता मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेनच्याही कामाला गती येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहे.
]
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दादरा-नगर हवेलीतील १०० टक्के, गुजरातमधील ९८.७९ टक्के आणि महाराष्ट्रातील ७१ टक्के जागेचे संपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्प खर्चवाढ टाळण्यासाठी प्रकल्पासाठी ८५ टक्के जमीन अधिग्रहित केल्याशिवाय प्रत्यक्ष काम न करण्याचा रेल्वे मंडळाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता.