मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपले मत व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे. माझा जो अजेंडा आहे तो मी कधीच सोडू शकत नाही. त्यामुळे काही लोकं आता सांगत होते, कुणी आम्हाला गटार नाल्याची घाण म्हणून संबोधत होते. कुणी म्हणत होते की, कामाख्या देवीला बळी देणार, आता कामाख्या देवींनी कुणाचा बळी घेतला. असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले.
तसेच शिंदे पुढे म्हणाले, इतकेच नाही तर, काही लोकं म्हणत होते की, कामाख्या देवीला आम्ही 40 रेडे पाठवले. पण काही लोकं आमचा बळी देण्यापासून ते काहीही बोलत होते. मॉं कामाख्या देवी बोलली, जो बोलला आहे तो रेडा आम्हाला नको', असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे.