मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. आज पुन्हा एकदा मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. तसेच, सभागृहात कामकाजा दरम्यान आदिवासी मंत्रालयाच्या मंत्र्यांनी नीट उत्तर न दिल्याने त्यांचा निषेध म्हणून सभात्याग केला.
"पन्नास खोके, चिडलेत बोके... ओला दुष्काळ जाहीर करा... नाहीतर खुर्च्या खाली करा... महाराष्ट्र के गद्दारों को, जुते मारो सालों को... गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... ईडी सरकार हाय हाय... पैसा आमच्या जनतेचा, नाही कुणाच्या बापाचा... शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो... गद्दार सरकारचा निषेध असो... सातवा वेतन न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... एसटी कर्मचाऱ्यांना वार्याहवर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... बलात्काऱ्यांचा सत्कार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणा देत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांववर ईडी सरकारच्या विरोधात विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.