मुंबई: दुसऱ्यांचे आमदार-खासदार चोरणं हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “चोरलेली वस्तू चोरबाजारात मिळते का बघा. तसे आता कुणी माणसे आमदार-खासदार गायब झाले, तर त्यांनाही तिथेच बघावे लागेल. स्वत:चा विचार नाही, आचार नाही. फक्त सत्ता पाहिजे. काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे. तसेच, सगळे आमदार, खासदार, नेते, स्वप्न चोरायचे. मग तुमचा पक्ष आहे की चोरबाजार, अशी खोचक विचारणाही उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि भाजपासोबत सत्तास्थापन करणे या गोष्टींमुळे शिवसेना आणि भाजपसोबत आता शिंदे गटाशी संघर्ष वाढलेला दिसत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर भाजपविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर ठाकरी शैलीत निशाणा साधला आहे.