वाशिम : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार बनले आहे. 50 आमदार आणि 12 खासदार जेव्हा एकत्र येऊन उठाव करतात, तेव्हा ते गद्दार कसे? असा सवाल शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच शिंदे गटात सामील होतील. असा दावा सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
50 आमदार आणि 12 खासदार जेव्हा येतात तेव्हा ते गद्दार कसे? आणखी काही आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावाही त्यांनि केलाय. 'आज काही लोक महाराष्ट्रचा दौरा करीत आहेत, आम्हाला पदरात घ्या म्हणतात, असं म्हणत नाव न घेता त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोलाही लगावला आहे.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे आज वाशिममध्ये आहेत. शिंदे गटातील खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावेळी श्रीकांत शिंदे, शहाजीबापू पाटील तसेच शिंदे गटातील अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीकांत शिंदे बोलत होते.