बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. एनडीएपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानंतर त्यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे.
दरम्यान, पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर, जेडीयूने एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तरीही त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. या घटनेनंतर नितीश कुमार राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी पोहोचले. नितीश कुमार कधीही राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात, असे बोलले जात होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.