जळगाव : राज्या्च्या मंत्रीमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे. यामुळे पालकमंत्री कोण? यावरून वाद व्हायला नको आणि विकास थांबायला नको. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
दोन्ही मंत्र्यांनी चांगल्या कामासाठी आपले सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी असे खडसे यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्यावर वेगळे झाले होते. मात्र बहुतांश शिंदे गटाच्या आमदारांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांनी असे ठरवले दिसत आहे; की तुम्ही हिंदुत्वसाठी इकडे आला आहेत तर मंत्री पदाची अपेक्षा नसावी, असे वक्तव्य राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केले.
दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होवून कॅबिनेट मंत्री पदाचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळात जळगाव जिल्ह्यालतील भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर खडसे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.