मुंबई: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर याआधी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे नेते देखील गजाआड आहेत. या केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले, 'काही आठवड्यांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली. ते विरोधात लिहायचे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीने देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. जो राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता त्यांच्याविरोधात भाष्य करतो, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे', अशा शब्दात शरद पवार यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला.