मुंबई: टी -२० वर्ल्डकप स्पर्धेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्याच्या आधीच सरावादरम्यान त्याच्या पाठीच्या वेदनांनी त्रस्त होता.
माहितीनुसार, आता जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतूनही बाहेर झाला आहे. बीसीसीआयकडून बुधवारी त्याच्या दुखापतीबाबत माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेत जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती.