नवी दिल्ली : देशात गेल्या पाच वर्षांत सर्वच वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. आता पुन्हा काही वस्तूंच्या किंमती वाढण्याचे संकेत केंद्र सरकारनेच दिले आहेत.
सध्या सरकारने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत साठा झपाट्याने कमी होण्याची सरकारला भीती होती. पण तोपर्यंत गैर बासमती तांदळाच्या निर्यातीत यंदा 11 टक्के वाढ झाली आहे. त्याचा फटका देशातंर्गत बाजारपेठेला बसला आहे. आता किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमती भडकणार आहेत.
तर गेल्याच आठवड्यात साठेबाजांवर कडक कारवाईचा इशारा सरकारने दिला होता. याचा अर्थ तांदुळ, गहू याची मोठ्या प्रमाणात साठेबाजी करुन ठेवण्यात आली आहे. यामुळेही बाजारात तांदळाचा तुटवडा होऊन किंमती भडकण्याचा धोका आहे.