Type Here to Get Search Results !

“......त्यामुळे या सरकारचे दिवस मर्यादित आहेत”: जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल!



जळगाव :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव दौऱ्यावर आहेत. जयंत पाटील मेळाव्यात कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.



ते म्हणाले, जे आमदार उद्धव ठाकरे यांची फसवणूक करून गेलेत. त्यांच्याविरोधात जनमत महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात सर्व महाराष्ट्रातील जनता आहे.  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे नाहीत तर या सरकारला वेळ नाही. या सरकारला शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नाही. त्यामुळे या सरकारलाच आता मर्यादित वेळ आहे. या सरकारचे दिवस मर्यादित आहेत. दिवसात जेवढं काही करायचं आहे तेवढं काम हे सरकार करत आहे, असे वक्तव्य करत जयंत पाटील यांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies