मुंबई: राज्य सरकारच्या आज मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयांमध्ये दिवाळीमध्ये लागणाऱ्या किराणा वस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांनी दुवाळीसाठी उपयुक्त असणारा रवा, चणाडाळ, साखर व तेल याचे प्रत्येकी एक किलो पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दरम्यान, या योजनेमुळे जवळपास राज्यभरातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामुळे ही दिवाळी शिधापत्रिका धारकांनासाठी अधिकच गोड झाली आहे.