माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आजपासून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून याबाबत गावामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत.
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. दिनांक २५ पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांनी सुरु केलेल्या या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आवळाई येथे सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचे बॅनर गावामध्ये लावण्यात आले आहेत.
आटपाडी तालुक्यातील शेटफळे व लाक्षणिक उपोषण तर आवळाई येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असल्याने आटपाडी तालुक्यामध्ये मराठा आंदोलनाचे स्वरूप तीव्र होवू लागले आहे.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा