जालना : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्च्याला जालन्यात हिंसक वळण लागल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. यावेळी संतप्त झालेल्या मोर्चेकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यासह शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी 100 ते 150 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मोर्चास हिंसक वळण लागले होते. निवेदन स्वीकारण्याच्या कारणावरून मोर्चात सहभागी काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी, तिथे असलेल्या शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी आता पोलिसांकडून कारवाईला सुरवात झाली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोबतच, या प्रकरणी 100 ते 150 जणांविरुध्द तालुका ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (स्तोत्र एबीपी माझा)