Type Here to Get Search Results !

अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले ; म्हणाले...



कर्जत :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे सर्व खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.  


प्रफुल पटेल यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही आमचा पक्ष सोडला नाही. नितिश कुमार, जयललिता, मेहबूबा मुफ्तींनी पक्ष बदलला, पण विचार बदलला का? अडीच वर्ष शिवसेनेसोबत होतो, पण विचारधारा बदलली का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.


ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतल्या यशामुळे जनता सुद्धा आपल्या पाठिशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच पक्षाचे नाव आहे. त्यामुळे गावपाळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणावे लागतील. 


अडचणीत आलेल्या लोकांसाठी आपण मदत केली पाहिजे. अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले. अजित दादांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले.


दरम्यान, कर्जतमध्ये छगन भुजबळांना मराठा आंदोलकांनी विरोध दर्शविला होता. यादरम्यान आंदोलकांकडून 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. नाशिकमध्ये गारांच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. 


त्यांचे अश्रू पुसायला जाणे माझे कर्तव्य होते. पण काहीजण चले जाओ चले जाओ करत होते. गावबंदी असल्याचे सांगून मला प्रवेश दिला जात नव्हता. पण काहींना प्रवेश दिला जातो. त्यामुळे राजकारण कोण करतंय हे आम्हाला माहीत आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies