बिहारच्या भागलपूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. कजरैली गावातील प्रकाश शाह यांचं लग्न तारण गावातील तरूणीसोबत ठरलं होतं.
27 तारखेला वरात लग्न गावात पोहोचली. लग्नाचे रितीरिवाज झाले. इतकंच काय तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हारही टाकले. पण त्यानंतर जेव्हा मुख्य विधीची वेळ आली तेव्हा नवरी घरातून फरार झाली. अशात नवरदेवाला नवरीशिवायच परत जावं लागलं.
नवरी अशी अचानक लग्न सोडून पळाल्याने दोन्ही कुटुंबियांमध्ये चांगलाच वाद झाला. यानंतर लग्नातील पाहुणे आपापल्या घरी परत गेले. पण नवरदेव आणि त्याचे कुटुंबिय तिथेच थांबले होते. मुलाकडील नातेवाईक त्याच्यासाठी दुसरी मुलगी शोधत होते. अशात कहलगावातील एका तरूणीसोबत लग्न ठरलं.
नाथनगर येथील मनसकामना नाथ मंदिरात हे ठरलं. या मंदिराच्या संस्थापकांनी सांगितलं की, तरूणाचं लग्न आधी ज्या तरूणीसोबत ठरलं होतं ती लग्न झाल्यावर पळून गेली. त्यामुळे दुसऱ्या तरूणीसोबत त्याचं लग्न जुळवण्यात आलं. 28 नोव्हेंबरला त्याचं लग्न इथे लावण्यात आलं. यावेळी मुलीकडील आणि मुलाकडील नातेवाईक उपस्थित होते.