Type Here to Get Search Results !

ईडी लावा, पक्ष फोडा अन् भाजप वाढवा : राष्ट्रवादीच्या नेत्याची भाजपवर टीका



माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : देशात मोदी सरकारने मागील दहा वर्षात एकीकडे मनमानी कायदे करून जनतेची लूट सुरू चालविली असताना दुसरीकडे ‘ ईडी लावा, पक्ष फोडा आणि भाजप वाढवा ‘ असा एककलमी कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.


माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये जयंत पाटील यांनी भाजपच्या विरोधात टोलेबाजी केली. माढा, साताऱ्यासह बहुसंख्य मतदारसंघांमध्ये जनमत विरोधात चालल्यामुळे भाजपची पायाखालील वाळू सरकू लागली आहे. म्हणूनच दबावाचे आणि धाकदपटशाचे राजकारण भाजपने पुन्हा सुरू केल्याचा आरोप करीत जयंत पाटील म्हणाले, पंढरपुरात आपल्या पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या ताब्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना जप्त करण्याच्या कारवाईमागे भाजपची दमनशाही आहे. 


म्हणूनच या दबावामुळे विठ्ठल कारखाना वाचविण्यासाठी अभिजित पाटील भाजपमध्ये गेले तरी त्यांना जाऊ द्या, पण अभिजित पाटील हे ‘नेताजी पालकर’ आहेत. ते पुन्हा आमच्या पक्षात परत येतील. दुसऱ्या बाजूला विठ्ठल कारखान्याचे हजारो सभासद शेतकरी त्याचा वचपा काढून भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही पाटील यांनी दिला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies