माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी खानापूर मतदारसंघांमध्ये सांगली लोकसभेसाठी दुपारी एक वाजेपर्यंत 37.97 टक्के मतदान संपन्न झाले.
सकाळी सात पासूनच मतदानाला सुरुवात झाली असून सकाळची सत्रात मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावली. दुपारच्या सत्रात मात्र मतदारांनी उन्हामुळे मतदान केंद्राकडे पाठ पिरवली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात कमी झाली होती. दुपार तीन पर्यंत मतदानाची टक्केवारी ही ३७.९७ टक्के झाली झाली असून सायंकाळ पर्यंत ५० टक्के पार होती का हे पहावे लागणार आहे.
मतदान करण्यासाठी लोक उत्साही असून यामध्ये ज्येष्ठ मतदाराबरोबरच नव मतदार व युवा मतदारही मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी हजेरी लावत आहे. सांगली लोकसभेसाठी यावेळी तिरंगी लढत होत असून महाविकास आघाडी व महायुती यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली असून सकाळच्या सत्रात वाढलेला मतदानाचा टक्का हा कोणाच्या पारड्यात जाणार हे दिनांक चार तारखेला समजणार आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात मात्र चुरशीने होत आहे. मतदारही या लोकशाहीच्या उत्सवांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत.