इकोनेट पुणे व अग्रणी संस्थेच्यावतीने गरजूंना किराणा साहित्याचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : विटा शहरात भंगार, काच, पत्रा कागद व प्लँस्टीक कचरा वेचणारे तसेच मजूरकाम करणारा गोसावी, भटका समूह गावापासून ४ किमी अंतरावर राहत आहे. या समूहाचे सर्व ४२ कूटूंबे लक्ष्मीनगर (भाळवणी) ता. खानापूर, जि. सांगली या ठिकाणी कच्ची पत्र्याची घरे, पालामध्ये दयनीय अवस्थेत राहत आहेत. मूख्यत्वे भंगार गोळा करणे,काच,पत्रा,कागद ,प्लँस्टीकचा कचरा गोळा करणे किंवा हंगामानूसार हाताला मिळेल ते काम करून ते आपली उपजिवीका चालवत आहेत. त्यांच्याकडे ना शिक्षण, निवारा,ना भांडवल,ना कोणती योजना घेण्यासाठी कागदपत्रे म्हणून ते दयनीय बिकट अवस्थेत जीवन जगत आहेत.
हे ही वाचा :- माणदेशातील ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन
त्यामधून २० भटके विमूक्त कूटूंबास जीवनावश्यक किराणा किटची मदत देण्यात आली. त्यांना तांदूळ, साखर, बेसन, गोडेतेल, साबण, बिस्कीट, पेस्ट, चहा पावडर, चटणी या दैनंदिन गरजेच्या किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. हे सर्व मदतकार्य अग्रणी संस्थेच्या संचालिका ॲड. शबाना मूल्ला, भटके विमूक्त संसाधन केंद्र समन्वयक मूनीर शिकलगार, संघटिका शोभाताई लोंढे, शिल्पाताई गूरव, भटके विमूक्त विकास मंचचे किशोरभाऊ राठोड, तुकाराम गुरव (महाराज), आप्पा माने तसेच स्वयंसेवक विकास जाधव, सचीन जाधव, जितू जाधव हे उपस्थित होते. यापूढेही जे अतिरिक्त गरजू कूटूंबे आहेत त्यांनाही मदत पोहोचवण्याचे नियोजन संस्था करीत आअसल्याचे मुनीर शिकलगार म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज