Type Here to Get Search Results !

राज्य सरकारची अधिसूचना निघेपर्यंत दुकाने/अस्थापना सुरू करू नयेत : जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी


राज्य सरकारची अधिसूचना निघेपर्यंत दुकाने/अस्थापना सुरू करू नयेत : जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात काही दुकाने/आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढल्याशिवाय कोणीही अशा प्रकारच्या आस्थापणा/दुकाने सुरू करू नयेत, असे निर्देशित केले आहे. जोपर्यंत राज्य सरकार अशा प्रकारची अधिसुचना काढत नाही तोपर्यंत  संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील, याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घेऊन लॉकडाऊनला सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies