विधानपरिषद निवडणुकीला निवडणूक आयोगाची परवानगी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम
मुंबई : अखेर विधानपरिषद निवडणुकीला निवडणूक आयोगाची परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले होते. याच पत्राचा आधार घेत राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त आहेत. तसंच उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती राज्यपाल यांनी निवडणुक आयोगाला केली होती. राज्यपालांच्या या विनंतीनंतर निवडणुक आयोगाने राज्यातील विधान परिषच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं होते. परंतु निवडणुक आयोगाने निवडणुका घेण्यास परवानगी दिल्याने महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज