Type Here to Get Search Results !

दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून

 



मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंबाने होत असलेल्या महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळातर्फे दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. 





फेब्रुवारी-मार्च २०२० च्या परीक्षेत उत्तीर्ण न झालेले व एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मुंबईतून या परीक्षेसाठी दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विद्यार्थी व पालकांना येणार्यान अडचणी सोडवण्यासाठी मुंबई विभागातर्फे विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. 






दरम्यान, परीक्षांच्या काळात जे विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराशातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांनी नियुक्ती मुंबई विभागीय मंडळातर्फे करण्यात आली आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies