Type Here to Get Search Results !

शेतकरी आंदोलनावर अभिनेते मुकेश खन्ना म्हणतात...

 



शेतकरी आंदोलनावर अभिनेते मुकेश खन्ना म्हणतात...



मुंबई : सुपरहिरो शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ७० वर्षांपासून देशात हेच सुरु आहे त्यावेळी नेहरूंनी शहरीकरणाला महत्व दिलं नसतं तर आज देशाची ही अवस्था नसती असा टोला त्यांनी लगावला आहे.



मुकेश खन्ना यांनी एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. ते म्हणाले, “लोकांना वाटतं मी भाजपा पाठिंबा देतोय पण हे खोटं आहे. मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांच्या त्याच समस्या आहेत. गेल्या ७० वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. अन् याला आपल्या देशाचं धोरण आहे. 



ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिलं. त्याऐवजी त्यांनी खेड्यांना सक्षम केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. देशातील ७५ टक्के भाग खेडी आणि गावांनी व्यापला आहे. आपण त्यांच्या विकास करायला हवा.” अशा आशयाची वक्तव्य केलेला त्यांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies