Type Here to Get Search Results !

“कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का?” : उपमुख्यमंत्री




“कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का?” : उपमुख्यमंत्री


मुंबई : कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का? अशी विचारणा केली आहे.असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करणाऱ्या विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 


“आता विरोधकांना काय म्हणावं…एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो,” अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.


प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख नसल्याच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “धनंजय मुंडे यांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली आहे ती सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता



Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies