Type Here to Get Search Results !

नगरपंचायत निकाल : राज्यात चर्चा फक्त... तासगावच्या रोहित पाटलांचीच...



आटपाडी : राज्यात नुकेतच नगरपंचायत, नगरपालिका यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांची भल्या-भल्या राजकीय नेत्यांना, सत्ताधारी मंत्री यांना पराभवाचा झटका दिला. असाच काहीसा निकाल सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लागला अन राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील (आबा) यांचे चिंरजीव रोहीत पाटील यांची चर्चा जिल्हाभर नव्हे तर संपूर्ण राज्यात झाली.


सुरुवातीला आमदार सुमनताई पाटील गटाला या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणुकाच्या नावाखाली शेवट पर्यंत वाट पहावयास लावून अंतिम क्षमी सर्व पक्षीय नेत्यांनी जनता आघाडी करून या निवडणुकीमधून आबा गटाला हद्दपार करण्याचा चंगच बांधला होता. 


परंतु अंतिम क्षणी आबा गटाने ताकदीने पॅनेल उभे केले. निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट जनता आघाडीबरोबर राहिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रोहित पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठींबा दिल्याने आबा गटाने निवडणुकीत नेटाने प्रचार केला.


प्रचारसभेमध्ये विरोधकाकडून रोहीत पाटील यांच्यावरती टिका केली. परंतु रोहित पाटील यांनी शांत राहून, वेळप्रसंगी आबा गटाची बाजू भक्कम मांडत सक्षम असल्याचे दाखवून दिले होते. तर प्रचाराच्या दरम्यान त्यांनी निकाला दिवशी माझा बाप आठवेल असे दिलेले आव्हान ही त्यांनी खरे करुन दाखवत, अवघ्या वयाच्या 23 व्या वर्षी रोहित पाटील यांनी खासदार, कारखानदार, माजी मंत्री या सर्वांना चितपट केले. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण, महाराष्ट्राभर चर्चा फक्त रोहीत पाटील यांचीच होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies