Type Here to Get Search Results !

इम्रान खान पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार? पाकिस्तानातल्या राजकीय घडामोडींचा भारतावर प्रभाव!

 



नवी दिल्ली : पाकिस्तानातल्या मोठ्या राजकीय घडामोडींचा भारतावर प्रभाव पडताना दिसत आहे. इम्रान खान यांच्या धोरणांचा, भारतविषयक धोरणांचा देखील दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रभाव झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे भारतावर मोठ्या प्रमाणात प्रभाव जोरदार होण्याची शक्यता आहे. इम्रान खान सरकार कोसळण्याच्या तयारीत असून प्रमुख मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान लवकरच राजीनामा देणार असल्याचे दिसत आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, येणार्या ३ एप्रिल रोजी इम्रान खान यांच्यावरील अविश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे.परंतु, , त्याआधीच महत्त्वाच्या मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे इम्रान खान सरकार अडचणीत सापडले आहे. पाकिस्तानमधील मुत्तेहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे सरकार पडण्याच्या बेतात आले आहे. बलुचिस्तानमधील आवामी पार्टीने सुद्धा इम्रान खान सरकारचा पाठिंबा काढला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies