Type Here to Get Search Results !

बैलगाडीतून रुग्णाना न्यावे लागते रुग्णांल्यात

 


 नांदेड :  मांजरी या गावाला साधा रस्ता नसल्याने हलाखीच्या परिस्थितीमध्ये बैलगाडीने रुग्णाना दवाखान्यात नेतांना रुग्ण मरण पावतो आहे. ही घटना नुकतीच घडली आहे. काही आदिवासी गावांमध्ये अजूनही कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासी माणसे  जीवन मरणाशी झुंज देत आहेत. आधुनिक संगणकाच्या युगात साध्या रस्ताच्या सुविधा अजुनही उपलब्ध होत नसेल तर हा घोर अन्याय आहे ? 


किनवट तालुक्यातील जलधऱ्यांपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झालीत पण खोऱ्यात वसलेल्या वागदरी व मांजरी माथा ही गावे भौगलीक सोयी सुविधेपासून वंचित असल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी येथील नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा काय आहेत. आरोग्याच्या सोयी-सुविधा, घरकुल, राशन कार्ड, पाणीपुरवठा योजनेचा लाभ देण्यासाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवणार असल्याची माहिती भेटीदरम्यान गावकऱ्यांना दिली.


भेट दिल्याच्या दोन दिवसातच मांजरी येथील माधव खुडे वय ६५ यांना आजारी असल्याने उपचारासाठी बैलगाडीतून जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने या रुग्णांचे वाटेतच निधन झाले. माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली आहे. हे गाव जलधरा गट ग्रामपंचायत असल्याने या गावाचे वास्तव्य १९६१ पासून आहे. जंगल मोठ्या प्रमाणात असून या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने या गावातील नागरिकांना गेल्या साठ वर्षापासून त्रास सहन करावा लागतोय. जलधरा येथील गावाशेजारी तलाव असून हा तलाव नाल्यावर बांधला असून पावसाळ्यात या नाल्यावर पुल नसल्याने पायी नाल्यातुन प्रवास करावा लागतो. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies