नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 408 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 20 हजार 409 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 32 रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात 20 हजार 958 कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
तसेच, देशात सध्या 1 लाख 43 हजार 384 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आहे. तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.48 टक्के आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1997 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे.