मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधासभेत भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे भावविक आवाहन केले.
आमदार भास्कर जाधव म्हणाले, 'एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणे हा एककलमी कार्यक्रम आहे'. असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
तसेच, 'तुमच्यावर यांचे प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावले मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल' असेही भावनिक आवाहन भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांना केले.