Type Here to Get Search Results !

वारीनंतर वाढू शकते कोरोना रुग्णसंख्या; राज्य शासनाचे सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश!



पुणे:  सध्या कोरोना रुग्णांसख्या काही प्रमाणात वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. वारीहून परतलेल्या वारकऱ्यांमार्फत कोरानाचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती राज्य शासनाला आहे. याबाबत सर्व जिल्हांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.



तसेच,  राज्यात दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी झाली नव्हती. यावर्षी वारी झाली. लाखो भाविक पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला पोचले. तेथून पुढे हे वारकरी पुन्हा आपापल्या गावी जातील, त्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल, अशी शक्यताही सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. 


त्यामुळे,  राज्यशासनाने सर्व जिल्हांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies