मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आज शिवसेनेवर पाठिंब्यावरुन ट्विट करत सडकून टीका केली.
शिवसेनेने श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास हा पक्षाचा ऐतिहासिक निर्णय ठरेल का? का माहित आहे? कारण पूर्वी बाळासाहेब आदेश द्यायचे, खासदार त्यांचे पालन करायचे. यावेळी खासदारांनी आदेश दिले, पक्षाने पाळले, असे होईल. यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत लोकशाहीचा अंत होईल, असा टोला लगावत संजय निरुपम यांनी ट्विट केले.