मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजून सत्ता स्थापन करुन एक महिना झाला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर, शिंदे गटातील २२ ते २३ आमदारांनी मंत्रिपदाची मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे, तर मंत्रिपद मिळाले नाही तर तीन ते चार आमदार शिवसेनेत परत जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गट अडचणीत येऊन सरकार कोसळू शकते.
तसेच, सत्ता स्थापन होऊन एक महिना झाला तरिही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिंदे गटातील प्रत्येकाल मंत्री व्हायचे आहे, या आमदारांनी मंत्रिपद मिळाले नाहीतर तीन ते चार आमदार पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. आणि तसे झाले तर शिंदे गटाकडे असलेली दोन त्रितांश ही संख्या राहणार नाही. त्यामुळे शिंदे गटाची कायदेशीर मान्यता रद्द होऊ शकते. त्यामुळे शिंदे गट अडचणीत येऊन सरकार कोसळू शकते असे बोलले जात आहे.