करगणी: करगणी गावातील एका महिलेने घरातील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गायत्री अतुल लांडगे (वय 22) असे मयत महिलेचे नाव आहे.
फिर्यादीनुसार, , मयत महिला गायत्री हिचे लग्न झाले असून तीला तिचे पती, दीर, सासू, सासरे,जाऊ, यांनी माहेरून गलाई दुकानासाठी 2 लाख रुपये घेऊन ये म्हणून तसेच, दिराने तीला शारीरिक संबंध ठेव असे म्हणून या कारणावरून तीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून तिने तिच्या सासरच्या घरी स्वता:च गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, सदर प्रकरणी अतुल दाजी लांडगे (नवरा), सागर दाजी लांडगे(दीर), विमल दाजी लांडगे(सासू), दाजी यशवंत लांडगे(सासरे), वर्षा सागर लांडगे(जाऊ) (सर्व रा. करगणी) यांच्या विरुद्धात दत्तात्रय दिलीप रणदिवे (वय 23) रा. देशमुख नगर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे. तसेच सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.