गडचिरोली: शेतकऱ्यांचे रब्बीचे पिक गेल्यामुळे आता त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे गडचिरोलीतील पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, त्याचबरोबर सरकारने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरग्रस्त भागाची पाहणी करावी असा टोलाही एकनाथ शिंदे यांना लगावला. गडचिरोली जिल्ह्यात दहा लाख हेक्टर जमीनी पूरामुळे बाधित झाल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करुन ददत जाहीर करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच तातडीने अधिवेशन घेण्याची गरज राज्याला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊन लोकांना कामाला लावणे.
याअगोदर आम्हीही सरकारमध्ये काम केले आहे. प्रशासनात काम केले आहे. त्यामुळे त्यांनी जरा बाहेर पडून नकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत मिळाली पाहिजे,