Type Here to Get Search Results !

मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनी केले भयंकर कृत्य!



बीड : बीडच्या धारूर तालुक्यातील असोला गावात एका 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. सदर घटना 8 दिवसांपूर्वी घडली असताना मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बीड येथील श्रीकृष्ण मोहन चोले (वय 27) असे मुलाचे नाव तर मोहन पंढरी चोले (वय 50) असे वडिलांचे नाव आहे. यांनी कोळपिंपरी शिवारातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 



दरम्यान,  मोहन चोले यांनी मुलाच्या विरहातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे; असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात  येत आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies