Type Here to Get Search Results !

“थोडी लाज ठेवा, राजीनामे द्या...” : ‘यांची’ बंडखोर आमदारांवर टीका!



मुंबई : बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. आदित्य यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. बोरीवलीच्या एका कार्यक्रमात ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. 


ठाकरे बंडखोर आमदारांवर टीका करताना पुढे म्हणाले, थोडी लाज ठेवा, राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. शिवसेनेचा इतिहास आहे.ज्यांनी ज्यांनी बंड केले ते कधीही टिकले नाहीत. फुटीरतावादी, गद्दार कसे असतात, हे आता कळले. गुवाहाटी ,झाडी, गोवा आणि मग सकाळी सहा वाजता सगळे ओके. स्वतःची राक्षसी महत्वकांक्षा बघून ही गद्दारी केली.



उद्धव ठाकरे जेव्हा सर्जरीमध्ये होते तेव्हा तुम्ही सोडून गेलात. तेव्हा तुम्ही आमदारांची जमवा जमव केली.राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं.ते त्यांनी दाखवून दिलं. बंडखोर आमदारांचा डान्सचा व्हिडीओ बघून मला किळस आला. राजकारण कमी केलं, हीच आमची चूक. आसाममध्ये पूर आलेला असताना हे मज्जा करत होते, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी  बंडखोर आमदारांवर  केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies