नांदेड : अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसखाली चिरडून 22 मेंढ्यांचा मृत्यू झाला. मेंढपाळ हा मेंढ्यांना घेऊन रेल्वे रुळ पार करत होता. त्यावेळी ही घटना घडली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सिरमट्टी गावाजवळ सोमवारी सायंकाळी एक मेंढपाळ आपल्या मेढ्यांना घेऊन रेल्वे रुळ ओलांडत होता. त्याचवेळी तेलंगाणातील आदिलाबाद येथून भरधाव वेगात नंदीग्राम एक्सप्रेस आली. रेल्वे चालकाला मेंढ्या रेल्वे रूळावर दिसल्या. त्यामुळे त्याने इमर्जन्सी ब्रेक मारला. मात्र तरीही मेंढ्या रेल्वे खाली आल्या. या घटनेत 10 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, 12 जखमी मेंढ्यांना गावकऱ्यांनी उपचारासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना 12 मेढ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची रेल्वे पोलिसात नोंद करण्यात आली आहे.