सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाळीनंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर तब्बल ३८ दिवसांपेक्षा अधिक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे नाराज झाले आहेत.
मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर दीपक केसरकर म्हणाले, “शालेय शिक्षण विभागाचा कोकणाला फारसा उपयोग होणार नाही. पर्यटन खाते हे सिंधुदुर्गच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे खाते होतं ते कोणाकडे गेलं हे मला माहीत नाही.मात्र , मला जे खातं मिळालं त्याची मला विशेष माहिती नाही. परंतु अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहीती घेऊन काम करणार आहे'. अशी प्रतिक्रिया देत केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.