सांगली - सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे येथे पतीने मोबाईलचे लॉक उघडून न दिल्याने निराश झालेल्या पत्नीने आत्महत्या केली. काल सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात शिवाजी खोत यांनी फिर्याद दिली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, शिरटे येथे सामान्य कुटुंबातील भगवान खोत हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अल्प शेती असल्याने भगवान खोत साखर कारखान्यात नोकरी आणि शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काल सकाळी भगवान यांचा मोबाइल पत्नीने घेतला. त्याचा लॉक काढून द्या असा हट्ट पत्नी भगवान यांच्याकडे करू लागली. परंतु भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाइल लॉक काढून दिला नाही त्यामुळे पत्नी निराश झाली आणि चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन पत्नीने आत्महत्या केली.
दरम्यान, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.