नंदुरबार : नवापूर तालुक्यात पावसामुळे वाघसेपा गावातील नदीकिनारी असलेली स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे उत्तर कार्य बाकी असताना प्रेत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने गावकऱ्यांकडून खेद व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन वाघसेपा गावातील स्मशानभूमीत पुरामुळे नदीचे स्वरूप आल्याच्या ठिकाणी तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे. अशी मागणी वाघसेपा गावाचे रोजगार सेवक विजय पाडवी, पोलीस पाटील विश्वास पाडवी, अविनाश गावित, दारासिंग पाडवी, कृष्णाजी पाडवी, जितेश पाडवी, दीपक पाडवी आदी ग्रामस्थांनी नदीकिनारी नुकसान झालेल्या स्मशानभूमीची पाहणी करून तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.